Seo Services
Seo Services

‘स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून महाराष्ट्र देशात अव्वल


नवी दिल्ली : ‘स्वच्छ सर्वेक्षण -2019’ मध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 45 पुरस्कार पटकावून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर स्वच्छ सर्वेक्षणात ‘बेस्ट परफॉर्मिंग स्टेट’चा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत पुरस्काराचे प्रदान करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात एका शानदार समारंभात ‘स्वच्छ सर्वेक्षण-2019’ चे निकाल घोषित करण्यात आले. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते सर्वोत्तम 10 पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. महाराष्ट्राला सर्वोत्तम (बेस्ट परफॉर्मिंग स्टेट) राज्याचा तिसऱ्या क्रमांकाचा  पुरस्कार प्रदान करण्यात आला. नगर विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र राज्य स्वच्छ भारत अभियानाच्या कार्यकारी संचालक सीमा ढमढेरे, राज्य अभियान संचालक जयंत दांडेगावकर व सुधाकर बोबडे यांनी राज्याच्या वतीने  हा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमास  केंद्रीय गृहनिर्माण व शहरी विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी, केंद्रीय शहरी विकास विभागाचे सचिव दुर्गा प्रसाद  मिश्रा उपस्थित होते.  


राज्यातील 27 शहरांना कचरा मुक्त शहरांसाठी ‘थ्री स्टार’ दर्जा

स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रातील 27 शहरे कचरामुक्त ठरली आहेत. यामध्ये मूल,वैजापूरवसई विरारमिरा-भाईंदरनवीमुंबईखोपोलीजुन्नरलोणावळा,सासवडभोरइंदापूरसंगमनेरपरळीपंढरपूरमंगळवेढामहाबळेश्वर,पाचगणीकराडरत्नागिरीमलकापूरपन्हाळावडगावकोल्हापूरगडहिंग्लज,विटातासगावकोरेगाव  या शहरांचा समावेश आहेकचरामुक्तीसाठी या शहरांना थ्री स्टार दर्जा देण्यात आला आहेया सर्व शहरांना केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले 

कराड शहराला स्वच्छ शहराचा पुरस्कार

स्वच्छ सर्वेक्षणातील पश्चिम विभागात एकूण 19 पुरस्कार देण्यात आले. यापैकी 13पुरस्कार महाराष्ट्राला मिळाले आहेतयामध्ये कराडलोणावळामूलउरण-इस्लामपूरउमरेडअंबाजोगाईखोपोलीविटादेवळाली-प्रवराइंदापूरपोंभूर्णामौदा सीटी या शहरांचा समावेश आहेएक लाख लोसंख्या असलेल्याशहरामधून सातारा जिल्हयातील कराडपुणे जिल्ह्यातील लोणावळा  चंद्रपूरजिल्ह्यातील मूल या शहरांना स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे 50 हजार तेलाख लोकसंख्या असलेल्या शहरांमध्ये पश्चिम विभागातून महाराष्ट्रातील उरण-इस्लामपूरउमरेडअंबाजोगाई  खोपोली या शहरांना स्वच्छ शहरांचा पुरस्कारमिळाला आहे.  25 ते 50 हजार लोकसंख्या असलेल्या िटादेवळाली-प्रवरा इंदापूर या शहरांनाही स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे तर 25 हजारापेक्षाकमी लोकसंख्या असलेल्या पोंभूर्णामौदामलकापूर या शहरांनाही पश्चिमविभागतून स्वच्छ शहरांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला 
      

नागरिक प्रतिसादामध्ये नवी मुंबईला पुरस्कार

10 लाखा पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या देशातील शहरांमध्ये नवी मुंबईशहराला स्वच्छ सर्वेक्षणात नागरिकांच्या उत्त प्रतिसादाबद्दल पुरस्कृत करण्यात आले. 3 ते  10 लाख लोकसंख्या असलेल्या शहरांमधून नागरिक प्रतिसादासाठीचंद्रपूर शहराला गौरविण्यात आले. तर घनकचरा व्यवस्थापनात केलेल्याउल्लेखनीय कार्यायाठी  लातूर शहराला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार देण्यात आला.

पन्हाळा स्वच्छ सर्वेक्षणात देशात 17 व्या स्थानी

स्वच्छ सर्वेक्षणात नवसंकल्पनांचा प्रभावी वापर केल्याबद्दल राजधानी शहरांसाठीअसलेला स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार बृन्हमुंबई शहराला देण्यात आलाकोल्हापूरजिल्ह्यातील पन्हाळा या शहराला देशातील 1 लाख लोकसंख्या असलेल्याशहरांच्या क्रमवारीत 17 वा क्रमांक मिळाला आहेदेशातील पाच शहरांना हापुरस्कार देण्यात आला आहेयामध्ये राजकोटभिलाई नगरविजयवाडा गाजियाबाद या शहरांचा समावेश आहेअहमदनगर कॅन्टोनमेंट बोर्डास उत्तमस्वच्छ कॅन्टोनमेंट पुरस्कार देण्यात आला आहे 

स्वच्छ रँकिंगमध्ये पहिल्या शंभरात राज्यातील 24 शहरे

केंद्रीय गृहनिर्माण  शहरी विकास मंत्रालयाने देशातील 423 शहरांची रँकिंगजाहीर केली आहेयामध्ये पहिल्या 100 शहरांत महाराष्ट्रातील 24 शहरांचासमावेश आहेया शहरामध्ये नवी मुंबई (7), कोल्हापूर (16), मीरा-भाईंदर (27),चंद्रपूर (29), वर्धा (34), वसई-विरार (36), पुणे (37), लातूर (38), सातारा (45),पिंपरी-चिंचवड(52), उदगीर (53), सेालापूर (54), बार्शी (55), ठाणे (57), नागपूर(58), नांदेड-वाघाळा (60), नाशिक (67), अमरावती (74), जळगाव (76),कल्याण-डोबिंवली (77), पनवेल (86), अचलपूर (89),बीड (94)  यवतमाळ(96) या शहरांचा समावेश आहे.

घनकचरा व्यवस्थापनात राज्यातील चार शहरे

घनकचरा व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रातील चार शहरांना स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कारदेऊन सन्मानित करण्यात आलेयामध्ये लातूरखोपोलीइंदापूर  मलकापूर याशहरांचा समावेश आहे.  स्वच्छतेबाबत नागरिकांचा प्रतिसाद मिळविण्यात प्रभावीकार्य केल्याबद्दल महाराष्ट्रातील नवी मुंबईचंद्रपूरउमरेड  पोंभर्णा या शहरांनास्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार प्रदान करण्यात आला 

‘स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून महाराष्ट्र देशात अव्वल ‘स्वच्छ सर्वेक्षण’ मध्ये सर्वाधिक ४५ पुरस्कार पटकावून महाराष्ट्र देशात अव्वल Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on March 06, 2019 Rating: 5

No comments:

ads 728x90 B
Powered by Blogger.