मुंबई : महाराष्ट्रातून आचारसंहिता लागू झाल्यानंतर, निवडणूक आयोगाकडून महिन्याभरात 112 कोटी रुपयांचा काळा पैसा ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्यानंतर काळ्या पैशाच्या 'देवणा-घेवाण' ला लगाम लागवण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली होती. दहा मार्च 2019 पासून महिन्याभराच्या कालावधीत या पथकाने राज्यातून 112 कोटी रुपये किमतीचा काळा पैसा जप्त करण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या पथकाने कारवाईत 40.81 रुपयांची रोकड, 44.76 कोटी रुपयांची सोनं-चांदी जप्त करण्यात आली आहे. तर 21.24 कोटी रुपयांचं मद्य, 6.12 कोटी रुपयांच्या ड्रग्जचाही यामध्ये समावेश आहे.
पैसे आणि मद्याच्या आमिषाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी ही ''देवणा-घेवाण'' होत असल्याचं निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं. मात्र हा पैसे कुठून कुठे जात होता, याची नेमकी माहिती उपलब्ध झालेली नाही. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा असल्यामुळे निवडणूक आयोगासह कस्टम, आयकर विभागाची यावर नजर आहे.
महाराष्ट्रातून आचारसंहिता लागू झाल्यानंतर, 112 कोटी रुपयांचा काळा पैसा ताब्यात
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 16, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
April 16, 2019
Rating:

No comments: