Seo Services
Seo Services

२१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली : देशाला यश प्राप्त करुन देण्याची आणि देशाचं भविष्य घडवण्याची ताकद शिक्षणात असून २१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं प्रतिपादन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित अखिल भारतीय शिक्षण संगम या संमेलनाचं उद्घाटन केल्यावर ते बोलत होते. नवीन शिक्षण धोरणा अंतर्गत मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञान आणि आकलनाचं मोजमाप केवळ भाषा ज्ञानाच्या आधारे लागणार नाही असं प्रधानमंत्री म्हणाले. नवीन शिक्षण धोरणामुळे देशभरात एकच अभ्यासक्रम विविध २२ प्रादेशिक भाषांमधे शिकवला जाईल असं मोदी यांनी सांगितलं. विविध भाषांमधल्या पाठ्यपुस्तकांचं प्रकाशनही यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते झालं. प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया – प्रधानमंत्री श्री योजनेअंतर्गत देशभरातल्या ६ हजार ७०७ शाळांना मिळून ६३० कोटी रुपयांचा पहिला हप्ता प्रधानमंत्री मोदी यांनी वितरित केला.

नवीन शिक्षण धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आलं असून ते दोन दिवस चालेल. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचंही भाषण यावेळी झालं. नवीन शिक्षण धोरणाच्या रुपाने स्वातंत्र्यसैनिकांचं स्वप्न प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साकार होत असल्याचं ते म्हणाले. 

या परिषदेत सोळा सत्रं आयोजित करण्यात आली असून प्रत्येक सत्रात वेगळ्या संकल्पनेवर चर्चा होईल. यात गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि प्रशासन, समान आणि सर्वसमावेशक शिक्षण, सामाजिक-आर्थिकदृष्ट्या मागास समुहाचे प्रश्न, राष्ट्रीय संस्था मानांकन आराखडा तसंच शिक्षणाचं जागतिकीकरण अशा विषयांचा समावेश आहे. शिक्षणसंस्था, धोरणकर्ते, उद्योग विश्वातले प्रतिनिधी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांना या धोरणाच्या अंमलबजावणीदरम्यान त्यांनी केलेले सर्वोत्तम उपाय आणि त्यांचा दृष्टीकोन मांडण्याची संधी मिळणार आहे. 

२१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन २१ व्या शतकातला भारत घडवण्यात शिक्षणाची भूमिका महत्त्वाची राहिली असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 29, 2023 Rating: 5

भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

 

मुंबई : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील भीमा-आसखेड येथील प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

विधानपरिषद सदस्य सचिन अहीर यांनी महाराष्ट्र विधानपरिषद अधिनियम ९३ अन्वये केलेल्या सूचनेला उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.मंत्री श्री. पाटील म्हणाले की, पुणे जिल्ह्यातील भीमा-आसखेड प्रकल्पात एकूण १ हजार ४१४ प्रकल्पग्रस्त असून त्यापैकी १११ प्रकल्पगस्त पर्यायी जमीन मिळण्यास पात्र होते. त्यांना पर्यायी जमिनींचे वाटप करण्यात आलेले आहे. उच्च न्यायालयात एकूण ३८८ प्रकल्पग्रस्तांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये झालेल्या आदेशाच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांकडून पर्यायी जमिनीसाठी ६५ टक्के रकमेचा भरणा करुन घेण्यात आला होता. या प्रकल्पग्रस्तांपैकी १०० प्रकल्पग्रस्तांना पर्यायी जमीन वाटप करुन ताबा देण्यात आलेला आहे. तसेच उर्वरित प्रकल्पग्रस्तांपैकी २१ प्रकल्पग्रस्तांनी खास बाब अनुदान स्वीकारले असून ६३ प्रकल्पग्रस्तांनी खास बाब अनुदानाची मागणी केली असल्याने त्यांची पात्रता तपासण्याची कार्यवाही सुरु आहे.उर्वरित २०४ प्रकल्पग्रस्तांची देखील पात्रता तपासून कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच त्यानंतर पुन्हा १६० प्रकल्पग्रस्तांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या अनुषंगाने न्यायालयाने पात्रता तपासून ६५टक्के रक्कम भरुन घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. या प्रकल्पग्रस्तांची पात्रता तपासण्यात येत आहे. गृह विभागाकडील माहितीनुसार आसखेड शेतकरी आंदोलकांवर एकूण ४ गुन्हे दाखल असून त्यापैकी तीन प्रकरणी गुन्हेमागे घेण्याबाबत गठित समितीमार्फत कार्यवाही होऊन गृह विभागाकडून कार्यवाही प्रस्तावितअसल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांबाबत शासनस्तरावर कार्यवाही सुरू – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 29, 2023 Rating: 5

मेट्रो स्थानकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी

 

पुणे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट आणि गरवारे कॉलेज ते रुबी हॉल मार्गिकेचे लोकार्पण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रुबी हॉल, सिव्हिल कोर्ट आणि शिवाजी नगर मेट्रो स्थानकांची पाहणी केली आणि रुबी हॉल स्थानक ते शिवाजी नगर मेट्रो स्थानकादरम्यान प्रवासदेखील केला.

यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, मेट्रोचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे आदी उपस्थित होते.

मेट्रोने प्रवास करण्याचे आवाहन

यावेळी पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, या दोन मार्गांमुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहर जोडले जाणार असून पुणे शहरातील महत्वाच्या ठिकाणी प्रवासदेखील सुलभ होणार आहे. नवीन मार्ग शिवाजी नगर, सिव्हिल कोर्ट, आरटीओ, पुणे रेल्वेस्टेशन, पीएमसी, संभाजी उद्यान, डेक्कन इत्यादी महत्वाच्या भागांना जोडत असल्याने पुणेकर नागरिकांना याचा फायदा होणार आहे.  

मेट्रो मार्गामुळे पुणेकरांना प्रवासाचा चांगला पर्याय उपलब्ध होणार असून शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल. नागरिकांना मेट्रो स्थानकापर्यंत प्रवास करण्यासाठी इलेक्ट्रिक बस आणि पार्किंगची सुविधादेखील असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी मेट्रोद्वारे प्रवास करावा, असे आवाहन त्यांनी केले. श्री. पाटील यांनी मेट्रो चालविणाऱ्या महिला चालकाशी संवाद साधून त्यांचे अभिनंदन केले.

असा आहे मेट्रो मार्ग

पुणे मेट्रोच्या फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट या ६.९ किलोमीटरच्या मार्गिकेवर ४ स्थानके आहेत, तर गरवारे कॉलेज ते रुबी हॉल या ४.७ किलोमीटरच्या मार्गिकेवर ७ स्थानके आहेत. अशाप्रकारे आतापर्यंत एकूण २१ स्थानकांसह २३.६६ किमी लांबीचा मेट्रो मार्ग पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे प्रवासाचा वेळ ५० टक्क्यांनी कमी होणार आहे. डेक्कन, शिवाजीनगर आणि पुणे महानगरपालिका येथे पीएमपीएमएल सेवेबरोबर समन्वय साधण्यात येणार आहे.

मेट्रो स्थानकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी मेट्रो स्थानकांची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून पाहणी Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 29, 2023 Rating: 5

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची २६ तुकडी बालताल आणि पहलगाम इथल्या तळाकडे रवाना

 

नवी दिल्ली : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची २६ तुकडी जम्मू इथल्या आधार शिबिरातून आज सकाळी कडेकोट पोलिस बंदोबस्तात बालताल आणि पहलगाम इथल्या तळाकडे रवाना झाली. या तुकडीत एकूण २,१०० यात्रेकरूंचा समावेश आहे.

आतापर्यंत ३ लाख ६९ हजारांहून अधिक भाविकांनी अमरनाथ इथल्या बर्फापासून तयार झालेल्या शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे. गेल्यावर्षी याच काळात तीन लाख ६५ हजार भाविकांनी दर्शन घेतलं होतं. अमरनाथ यात्रा ३१ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. 

अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची २६ तुकडी बालताल आणि पहलगाम इथल्या तळाकडे रवाना अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांची २६ तुकडी बालताल आणि पहलगाम इथल्या तळाकडे रवाना Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 28, 2023 Rating: 5

आयसीस प्रकरणात एनआयएकडून पुण्यातील आणखी एकाला अटक

 

नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने आयसिसशी संबंधित प्रकरणात काल आणखी एका व्यक्तीला अटक केली. पुण्यातील कोंढवा इथं छापा टाकून डॉ अदनान अली सरकार याला अटक करण्यात आली असून त्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं आणि इसीसशी संबंधित कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत.

हा आरोपी दहशतवादी कारवायांसाठी तरुणांची भरती करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी एनआयएनं या आधी मुंबई, ठाणे आणि पुण्यातून चौघांना अटक केली आहे. 

दहशतवाद विरोधी पथकानेही बुधवारी पुण्यातील कोंढवा परिसरात; दहशतवाद्यांना आश्रय देण्यास मदत केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. पुणे पोलीस दलातील कोथरुड पोलिसांनी १८ जुलै रोजी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यानंतर हे प्रकरण पुणे दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपवण्यात आलं होतं. या प्रकरणातच पुणे एटीएसनं अब्दुल कादीर दस्तगीर याला अटक केली असून त्याला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश अतिरिक्त सत्र न्यायाधीश वी आर कचरे यांनी काल दिले. 

आयसीस प्रकरणात एनआयएकडून पुण्यातील आणखी एकाला अटक आयसीस प्रकरणात एनआयएकडून पुण्यातील आणखी एकाला अटक Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 28, 2023 Rating: 5

गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं भांडवली मूल्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन

 

नवी दिल्ली : गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. १० वर्षांपूर्वी हे बाजारमूल्य केवळ ७४ लाख कोटी रुपये होतं. गेल्या १० वर्षात ते ४ पट वाढून ३०० लाख कोटी रुपये झाल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज दिली. त्यांच्या हस्ते आज मुंबईत AMC रेपो क्लिअरिंग लिमिटेट आणि कॉर्पोरेट डेब्ट मार्केट विकास फंडाचं उद्घाटन झालं. त्यावेळी त्या बोलत होत्या.

MSCI उदयोन्मुख बाजार निर्देशांकात तर भारताचं प्रमाण ६ पूर्णांक ३ दशांश टक्क्यांवरुन साडे १४ टक्क्यांच्या पुढे गेल्याचं त्या म्हणाल्या. किरकोळ डिमॅट खातेधारकांची संख्या गेल्या १० वर्षात २ कोटींवरुन साडे ११ कोटींपर्यंत वाढल्याचं त्यांनी सांगितलं. म्युच्युअल फंड उद्योगातही मालमत्ताही ८ लाख कोटींवरुन ४४ लाख कोटींपर्यंत गेल्याची माहिती त्यांनी दिली. 

गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं भांडवली मूल्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन गेल्या १० वर्षात देशातल्या बाजारपेठांचं भांडवली मूल्य मोठ्या प्रमाणात वाढल्याचं केंद्रीय अर्थमंत्री यांचं प्रतिपादन Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 28, 2023 Rating: 5

पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली : पृथ्वीची देखभाल आणि संरक्षणासाठी देशात अनेक पर्यावरण संरक्षक उपक्रम राबवले जात आहे. पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. जी 20 देशांच्या ECSWG अर्थात पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्य गट तसंच पर्यावरण आणि हवामान खात्याच्या मंत्र्यांच्या चौथ्या बैठकीचा आज चेन्नईत समारोप झाला.

या बैठकीला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केलं. या बैठकीला सदस्य देशांचे तसंच निमंत्रित देश आणि अनेक आंतरराष्ट्रीय संघटनाचे मिळून सुमारे 300 प्रतिनिधी या तीन दिवसीय बैठकीत सहभागी झाले होते. 

पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं - प्रधानमंत्री पर्यावरण रक्षणाचं महत्त्वं अधोरेखित करत समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं जबाबदारीनं काम करावं - प्रधानमंत्री Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय on July 28, 2023 Rating: 5
ads 728x90 B
Powered by Blogger.