भोसरी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदी मंदिरातील विनामंडपातून २५ जूनला सायंकाळी ४ वाजता पंढरपूरला आषाढी वारीसाठी प्रस्थान होणार आहे. या वर्षी पुणे येथे दोन, तर सासवड येथे दोन मुक्काम असणार आहेत. १२ जुलैला आषाढी एकादशीनंतर सहा दिवस पंढरपूरमध्येच पालखीचा मुक्काम राहणार आहे. १७ जुलैला आळंदीकडे परतीचा प्रवास सुरू होईल.
दिनांक २५ जूनला पालखीचे प्रस्थान झाल्यावर आजोळ घरी पाहिला मुक्काम होईल. दिनांक २६ व २७ जूनला पुणे येथे स्वागत व पाहूणचार होईल. २८ जूनला सासवडकडे प्रस्थान होईल.
या वर्षी एकादशीला पुण्यातून न निघता दशमीला पालखी सासवडकडे निघणार आहे.
लोणंद येथे उभे रिंगण व मुक्काम, ३ जुलैला तरडगाव मुक्काम, ४ जुलैला फलटण मुक्काम, ५ जुलैला बरड येथे पाहिले गोल रिंगण व मुक्काम, ६ जुलैला नातेपुते मुक्काम, ७ जुलैला माळशिरस येथे दुसरे गोल रिंगण व मुक्काम होईल. ८ जुलैला वेळापूर येथे तिसरे गोल रिंगण व मुक्काम, ९ जुलैला भंडीशेगाव मुक्काम होईल.
१० जुलैला सकाळी वाखरी प्रवासात भंडीशेगाव येथेच दुसरे उभे रिंगण व चौथे गोल रिंगण होईल. यानंतर वाखरी येथे मुक्काम. ११ जुलैला विसबावी येथे तिसरे उभे रिंगण होईल. त्यानंतर पालखीचे पंढरपुरात आगमण होईल. १२ जुलै एकादशीला नगर प्रदक्षिणा व श्रींच्या पादुकांचे चंद्रभागा स्नान होईल.
आळंदीमधून माऊलींच्या पालखीचे २५ जूनला प्रस्थान
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 20, 2019
Rating:
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 20, 2019
Rating:

No comments: