अहमदनगर : नक्षलवादी परके नाहीत. त्यांचा जन्म महाराष्ट्रात झालाय. सरकारने चर्चेतून मार्ग काढावा, मी मध्यस्थीसाठी तयार आहे, असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
बंदुकीच्या गोळीने हे प्रश्न सुटणारे नाहीत. सलोख्याने आणि चर्चेने हे प्रश्न सुटणारे आहेत, तेव्हा आपण चर्चा करण्याचे धोरण ठेवावं, असंही अण्णा म्हणाले.
गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा परिसरात केलेल्या नक्षलवाद्यांच्या हल्लात 15 जवान शहीद झाले होते. याच मुद्द्यावर अण्णांनी माध्यमांशी संवाद साधला.
समाजाच्या हितासाठी मी मध्यस्थी करायला तयार आहे, असंही ते म्हणाले.
“नक्षलवादी परके नाहीत, सरकारने चर्चेतून मार्ग काढावा; ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
May 05, 2019
Rating:

No comments: