मूंबई : देशातील सर्वात मोठे प्रवासी महामंडळ असलेल्या एसटी महामंडळाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. व्यवस्थापनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे एसटीच्या रोजच्या प्रवासी संख्येत कमालीची घसरण होत आहे. अपघातांचे प्रमाण वाढणे, कंत्राटी शिवशाही मालकांची अरेरावी, पूर्वसूचना न देता एसटी फेऱ्या रद्द करणे या कारणांमुळे एसटीची रोजची प्रवासी संख्या नऊ महिन्यांमध्ये ७० लाखांवरून सुमारे ५८ लाखांपर्यंत घसरल्याचे दिसून येत आहे.
एसटीच्या तिकीट दरात प्रवाशांना २५ टक्के ते १०० टक्के सवलत देण्यात येते. सद्यस्थितीत अशा २६ प्रकारच्या सवलती एसटीमध्ये दिल्या जातात. मात्र कर्मचाऱ्यांकडून सवलतधारकांना अयोग्य वागणूक मिळते. प्रवासीपूरक योजना केवळ कागदावरच आहेत. यामुळे एसटीतील हक्काचा प्रवासी दुरावला जात असल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
...तर प्रवासीवाढीची शक्यता
सवलतधारकांचीही एसटीकडे पाठ
लेखापरीक्षणासाठी तयार केलेल्या एसटी महामंडळातील तुलनात्मक अहवालानुसार, एप्रिल ते डिसेंबर २०१७ च्या तुलनेत एप्रिल ते डिसेंबर २०१८ या कालावधीत बहुतांश प्रवाशांनी एसटीला नापसंती दर्शवली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१८ या काळात एकूण १७७.५० कोटी प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. तर, २०१७ मध्ये प्रवासी संख्या १८२.९७ कोटी इतकी होती.
एसटी महामंडळाच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ
Reviewed by साप्ताहिक एकच ध्येय
on
March 24, 2019
Rating:
No comments: